रत्नशास्त्रात काही चमत्कारिक रत्नांचा उल्लेख आहे जे केवळ (marriage)विवाहातील अडथळे दूर करण्यास मदत करत नाहीत तर आर्थिक अडचणीदेखील क्षणार्धात दूर करू शकतात. चला या रत्नांबद्दल जाणून घेऊया.

लग्न लवकर होण्यासाठी कोणते रत्न योग्य

हातात कोणता खडा घातल्याने लवकर लग्न होते

रत्नशास्त्रानुसार माहिती

रत्नशास्त्र स्पष्ट करते की काही रत्ने व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात. ती धारण केल्याने व्यक्तीचे भाग्य उजळते, लग्नातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक(marriage) परिस्थिती मजबूत होते. तथापि, सर्व रत्ने प्रत्येकासाठी शुभ असतात असे नाही, म्हणून ती धारण करण्यापूर्वी एखाद्या विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. चला दोन खास रत्नांबद्दल जाणून घेऊया जे धारण केल्यावर केवळ लग्नातील अडथळे दूर होत नाहीत तर आर्थिक समस्यांपासून मुक्ततादेखील मिळते. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

पुष्कराज अर्थात गुरूचा खडा

पुष्कराज ज्याला पुखराज असेही म्हटले जाते हा गुरू ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारा मानला जातो. हे रत्न व्यक्तीच्या जीवनात नशीब, स्थिरता आणि यश आणते. पुष्कराज धारण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि जीवनात शांती येते. शिवाय, हे रत्न आर्थिक प्रगतीमध्ये देखील मदत करते.

पुष्कराजाचे फायदे

पुखराज घातल्याने विवाहाशी संबंधित अडथळे दूर होतात. करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. नकारात्मक ऊर्जा आणि ताणतणाव दूर होतात. व्यक्तीचा आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते असे रत्नशास्त्राप्रमाणे सांगण्यात येते. हा खडा घालण्यासाठीही जप आणि मुहूर्ताची गरज भासते असे काही ज्योतिषी सांगतात

पुष्कराज कसा घालायचा?

सोन्याच्या किंवा चांदीच्या अंगठीत बसवलेल्या तर्जनी (पहिल्या बोटावर) पुष्कराज घालणे शुभ आहे. गुरुवारी सकाळी तो घालावा. हे रत्न धारण करण्यापूर्वी, गंगाजल आणि कच्च्या दुधाने ते शुद्ध करणे आणि “ॐ बृं बृहस्पतये नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करणे आवश्यक मानले जाते. या मंत्राचा जप केल्यानंतरच हा खडा आपल्या तर्जनीमध्ये घालावा आणि कायम ठेवावा

कोणासाठी फायदेशीर आहे पुखराज?

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी गुरूचा खडा अर्थात पुष्कराज फायदेशीर असून या राशीच्या व्यक्ती कुंडलीनुसार आणि ज्योतिषतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे रत्न आपल्या बोटात घालू शकतात.

पाचू

पन्ना अर्थात पाचू हा बुध ग्रहाचा रत्न मानला जाते. हे रत्न बुद्धिमत्ता, संवाद आणि संपत्तीच्या क्षेत्रात यश आणते. पाचू धारण करणाऱ्यांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. हे रत्न एकाग्रता वाढविण्यास आणि मानसिक शांती प्रदान करण्यासदेखील मदत करते. अनेकदा हे रत्न सेलिब्रिटी वापरताना आपल्याला दिसतात.

पाचूचे फायदे

कामातील अडथळे दूर होतात. व्यक्तीला संपत्ती आणि आर्थिक स्थिरता मिळते. व्यक्तीचे संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो. जीवनात सौभाग्य आणि यशाच्या संधी वाढतात. पाचू आपल्या बोटात वा हातात, गळ्यात कसा घालायचा? असा प्रश्न असेल तर सोन्याच्या किंवा चांदीच्या अंगठीत बसवून करंगळीत हिरवा पाचू घालणे सर्वात शुभ मानले जाते. हे रत्न बुधवारी घाला. रत्न धारण करण्यापूर्वी “ॐ बुं बुधाय नमः” हा मंत्र उच्चारावा.

कोणत्या राशींसाठी हे रत्न शुभ आहेत?

रत्नशास्त्रानुसार, पाचू हे रत्न वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीसाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते. जर या राशीच्या लोकांनी हे रत्न विधीनुसार धारण केले तर त्यांच्या जीवनात अभूतपूर्व बदल येऊ शकतात.

हेही वाचा :

बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये; संतापलेल्या पतीने केला ‘तो’ धक्कादायक प्रकार…
PF खात्यातून सर्व पैसे काढू शकता, नवा नियम जाणून घ्या….
माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव..