आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश(assembly) कुमार यांनीही मतदारांच्या दृष्टीने लोकप्रिय पाऊल उचलले. राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा त्यांनी गुरुवारी केली. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि ‘राजद’ नेते तेजस्वी यादव यांनी, सत्तेत आल्यास २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन या आधीच दिलेले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ होणार असून, मोफत वीजेचा लाभ(assembly) नागरिकांना १ ऑगस्टपासून मिळेल, अशी घोषणा नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर केली आहे. याचा अर्थ १२५ युनिटपर्यंत वीजवापर केलेल्या घरगुती ग्राहकांना जुलै महिन्याच्या देयकामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याचा फायदा बिहारमधील एक कोटी ६७ लाख नागरिकांना होणार असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
‘सध्याच्या परिस्थितीत बिहारला ग्रिडमधून उच्च दराने वीज मिळत असूनही (assembly)आम्ही सर्व ग्राहकांना स्वस्त वीजपुरवठा करीत आहोत’, असा दावाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार समर्थन केले आहे. पुढील तीन वर्षांत पर्यायी उर्जास्रोतांच्या माध्यमातून राज्यात अंदाजे १० हजार मेगावॉट वीजनिर्मिती होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
निवडणूक आयोग भाजपची ‘चोरी शाखा’- राहुल गांधी
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मतदारयादी फेरपडताळणी प्रक्रियेवर काँग्रेसने पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून निवडणुकांमध्ये फेरफार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे , असा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला. ‘निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपची ‘ निवडणूक चोरी शाखा’ झाली आहे का , असा बोचरा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी
‘तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा…’; ‘प्राडा’ची टीम कोल्हापुरात असतानाच HC चा दणका
कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली