कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती (tragically)परिसरात भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बुधवारची सकाळ उजाडली ती या धक्कादायक वृत्ताने. हे वृत्त ही अफवा आहे की सत्य घटना याची खात्री करून घेण्यासाठी घरोघरी दूरदर्शन संच सुरू करण्यात आले. या अविश्वसनीय वृत्तावर ते खरेच असल्याचे शिक्का मोर्तब झाल्यावर अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. काहीसे मिश्किल,फटकळ, स्पष्ट वक्ते, जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर असलेले, अभ्यासू आणि कठोर प्रशासक म्हणून सर्व परिचित असलेल्या अजितदादांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रातील “दादा पर्व”अस्तंगत झाले आहे. त्यांचा अकाली अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राच्या समाज मनाला चटका लावणारा ठरला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर आर पाटील यांच्यानंतर तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या अजितदादा पवार यांच्या निधनाने बुधवारी अवघा महाराष्ट्र हळवळला. सहकारातून राजकारणात आलेल्या अजितदादांची साडेचार दशकांची संघर्षशील कारकीर्द. शरद पवार यांच्यासारखे दिग्गज व्यक्तीमत्व असताना त्यांच्याच वर्तुळात राहून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आव्हानात्मक काम अजितदादा यांनी केले.

मोठ्या झाडाखाली किंवा मोठ्या झाडाच्या सावली खाली दुसरे रोपटे मोठे होत नाही (tragically)हा समज दादांनी खोटा ठरवला.पवार घराण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे यांनी कुटुंबाला राजकारणापासून चार हात दुरुस्त ठेवले. कौटुंबिक कार्यक्रमासाठी पवार कुटुंबीय एकत्र येत असत. कुटुंब वेगळे आणि राजकारण वेगळे अशी स्वच्छ भूमिका पवार घराण्याची होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असे वातावरण तयार होत असतानाच अजितदादा यांची एक्झिट ही पवार कुटुंबासाठी वज्राघात ठरली. महाराष्ट्राला तर प्रचंड धक्काच बसला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अजितदादा पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर येणार होते. त्यासाठी एका छोट्या विमानातून ते बारामतीकडे येण्यास निघालेले होते. सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे विमान धावपट्टीवर लँडिंग होणार होते पण त्या आधी काही मिनिटे विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिकाला त्याचे लँडिंग करता आले नाही. एक घिरटी मारून, ते जमिनीवर उतरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच हे विमान जमिनीवर आदळले. क्षणात त्याचे तुकडे झाले आणि आगीचा लोळ उठला.
पाठोपाठ स्फोटाचे आवाजही आले. पेट्रोलची टाकी फुटतानाचे ते आवाज असावेत. (tragically)अपघाताचे दृश्य पाहिल्यानंतर त्यातून कुणी जिवंत राहिला असेल असे कुणालाही वाटले नव्हते. विमान कोसळताना चे दृश्य अनेकांनी पाहिले. विमान कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठलेले अनेकांनी पाहिले. आसपासच्या लोकांनी घटना स्थळी धाव घेतली. पण क्षणार्धात होते ते नव्हते झाले होते.अजित दादा पवार यांनी 1982 मध्ये सहकारात पदार्पण केले. त्यानंतर 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अर्थात तेव्हा त्यांना शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. पण दिल्लीच्या राजकारणात ते फार काळ रमले नाहीत. त्यांनी मग विधानसभा लढवून ती जिंकली आणि राज्याच्या राजकारणात ते सक्रिय झाले. नंतर ते मंत्री झाले. मंत्री म्हणून त्यांच्याकडे जे जे विभाग आले त्या त्या विभागाचा ते सखोल अभ्यास करत असत. सरकारची ध्येयधोरणे ही सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आखण्यात आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. सामान्य माणसाची कामे ही शासकीय कार्यालयातील टेबलावर प्रलंबित पडता कामा नयेत यावर त्यांचा कटाक्ष असायचा. अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या फायली मधील चुका ते शोधून काढायचे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी दादांना दचकून असंत.
म्हणूनच त्यांची कठोर प्रशासक म्हणून मंत्रिमंडळात ओळख तयार झाली होती.
शरद पवार यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे आणि नव्या (tragically) लोकांच्याकडे पक्षीय सूत्रे सोपवावीत अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली होती तेव्हा त्यांच्यावर चौफेर टिकाही झाली होती. शरद पवार यांनी आता राजकीय दृष्ट्या निवृत्त व्हावे ही त्यांची भूमिका कायम राहिली. आणि मग मनासारखे काही घडत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वभावाप्रमाणेच पक्षात बंडखोरी केली. बंडखोरी केल्यानंतर सुद्धा त्यांनी शरद पवार हे जसे आपले काका आहेत तसेच ते या देशाचे मोठे नेते आहेत याचे भान ठेवून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध कायम ठेवले होते. अजित दादा पवार यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पुण्यानंतरचे आवडते शहर म्हणून ते कोल्हापूर कडे पाहत असत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झाले होते. त्या काळात ते कोल्हापुरात सायकल वरून फिरत असत. त्यांच्या भगिनी विजया पाटील यांचे सासर कोल्हापूरच. त्या राजारामपुरी परिसरात राहतात. या बहिणीकडे अजितदादा यांचे जाणे येणे होते. वर्षभरात किमान दोन चार वेळा तरी ते कोल्हापूरला दौऱ्यावर येत असत. कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे आणि विकास व्हावयाचा असेल तर या शहराची हद्दवाढ झाली पाहिजे असे मत ते वेळोवेळी कोल्हापुरात आल्यानंतर व्यक्त करायचे.
भाषण करताना ते रंगात आले की, ते असे काही बोलायचे की, (tragically)लोकांची दाद त्यांना मिळायची. व्यासपीठावरून बोलताना एखाद्या कार्यकर्त्याला नाव घेऊन बोलावून त्याची फिरकी घेत असत. त्याचबरोबर व्यासपीठावरून खाली उतरताना अनेक कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून तुझे कसे काय चालले आहे, घरचे लोक कसे आहेत अशी विचारपूस करायला ते विसरत नसत. आणि म्हणूनच त्यांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यानंतर अजित दादा पवार यांना सन्मान दिला जायचा. nमहापालिका निवडणुकीतील त्यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील भाषणे खूप गाजली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी केलेली टीका खूप गाजली. पण नंतर त्यांनी मला तसे बोलायचे नव्हते किंवा बोलण्यामागे माझा हेतू वाईट नव्हता असा खुलासाही ते दिलदारपणे करत असत. शरद पवार आणि त्यांच्या बंधूंचे आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बोळीवडे गाव. म्हणूनच पवार कुटुंबीयांचे कोल्हापूर वर विशेष प्रेम. अजितदादा पवार हे सुद्धा त्याला अपवाद नव्हते.
हेही वाचा :
वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट! ६६ वर्षे, ६ महिने, ६ दिवस…; वयाचा विचित्र योगायोग
नि:शब्द! अजित पवारांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांच्यापुढे डोंगराएवढं दु:ख
मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भिषण अपघात टळला, माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले