सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे. (benefit) या नवीन नियमांनुसार आता महत्त्वाचे बदल केले जाणार आहे. नवीन नियमानुसार आठवड्याला चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन कामगार कायद्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याचा आठवड्याचा कामाचा वेळ ४८ तासांपेक्षा जास्त नसणार आहे. याचाच अर्थ असा की, कंपनी आणि कर्मचारी ४८ तास कितीही दिवसात करु शकतात. दर दिवशी १२ तास काम करुन आठवड्याला तीन दिवस सुट्टी घेऊ शकतात.

नवीन कामगार कायद्यात हा नियम सर्वांसाठी लागू नाहीये.(benefit)रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी कामाचा कालावधी ८ तासांचाचा असतो. त्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जातो. त्यांना ओव्हरटाईमसाठी डबल पैसे मिळतात.नवीन कामगार कायदे कामगारांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. लवचिकता आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठे पाऊल आहे. सध्या जरी फक्त काही कामांमध्ये चार दिवसांचा आठवडा असला तरीही भविष्यात भारतासाठी महत्त्वाचा बदल ठरु शकतो.
मिडिया रिपोर्टनुसार, प्रोडक्शन, पायाभूत सुविधा,(benefit) आयटी, शेअर्ड सर्व्हिस यामध्ये अंबलबजावणी केली जाऊ शकते. या ठिकाणी शिफ्टवर आधारित कामे होतात. त्या ठिकाणी हा कायदा लागू होऊ शकतो. खाजगी कंपन्या त्यांच्यानुसार या नियमांची अंबलबजावणी करु शकतात. ज्या क्षेत्रांमध्ये तात्काळ गरजा असतात आणि त्यांना रिअल टाइम डिलिव्हरीची अपेक्षा असते तिथे हा नियम लागू करणे थोडे आव्हानात्मक असू शकते. त्यामुळे भविष्यात काही क्षेत्रांमध्ये हा नियम लागू होऊ शकतो.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?