आजच्या वेगवान जीवनशैलीत मुलांवर अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि बदलत्या दिनचर्येचा खोलवर परिणाम होत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर(health) दिसून येतो. लहान वयातच ताण, चिंता, भीती किंवा एकाकीपणा जाणवत असल्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसतात. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी पालकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे.मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्यासाठी कोणते उपाय महत्त्वाचे ठरतात, याबाबत तज्ञांनी सांगितलेल्या पाच टिप्स जाणून घेणे आवश्यक आहे. या टिप्समुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, भावनिक स्थैर्य विकसित होते आणि त्यांच्या एकूण विकासात सकारात्मक बदल घडतो.

मानसिक आरोग्यासाठी (health)सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येणे. घरी असे वातावरण असणे गरजेचे आहे ज्यात मुले भीती न बाळगता आपले विचार सांगू शकतील. पालकांनी दररोज कमीतकमी काही वेळ मुलांशी बोलण्यासाठी राखून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या शाळा, मित्र, अभ्यास आणि दिनचर्येबाबत शांतपणे चर्चा करा.मुलं एखादी समस्या सांगत असतील तर त्यांना मध्येच थांबवू नका. त्यांचे विचार आणि भावना धीराने ऐकून घ्या. त्यांच्या भावना योग्य आहेत, हे त्यांना समजावून द्या. मुलांना “फक्त ऐकून घेणे” हे अनेकदा औषधापेक्षा जास्त प्रभावी ठरते. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक तणाव दूर होतो.

मुलांना त्यांच्या भावना ओळखण्यास, समजून घेण्यास आणि योग्य प्रकारे व्यक्त करण्यास शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. राग, दुःख, घाबरणे किंवा तणाव या भावना कमी नाहीत, आणि त्या निरोगी पद्धतीने हाताळण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लागली पाहिजे. खोल श्वास घेणे, आवडीची खेळणी, चित्रकला, संगीत किंवा एकांतातील वेळ हे उपाय मुलांसाठी प्रभावी ठरतात. त्याचबरोबर, मुलांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे. मोबाईल किंवा इतर कामांपासून दूर राहून मुलांसोबत गेम खेळणे, फिरायला जाणे किंवा कथा वाचणे हे त्यांच्यात सकारात्मकता आणतात. निरोगी आहार, पुरेशी झोप आणि दररोज शारीरिक हालचालही मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

डिजिटल युगात मुले तासन्तास स्क्रीनसमोर बसताना दिसतात, ज्यामुळे त्यांची भावनिक आणि मानसिक वाढ मंदावते. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहन द्या. खेळामुळे तणाव कमी होतो आणि सामाजिक कौशल्यांची वाढ होते.महत्त्वाचे म्हणजे, मुलांकडून वास्तववादी अपेक्षा ठेवणे. प्रत्येक मूल वेगळे आहे, त्यांची क्षमता, आवड आणि शिकण्याचा वेग वेगळा आहे. मुलांची इतरांशी तुलना केल्यास त्यांचा आत्मविश्वास ढासळू शकतो. त्यांच्या छोट्या कामगिरीचेही कौतुक करा आणि त्यांच्या प्रयत्नांना महत्त्व द्या. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

हेही वाचा :

शेख हसीना!”सजा ए मौत” न्याय कि, न्यायाची थट्टा ?
अननस खाण्याअगोदर ‘हे’ वाचा, ‘या’ लोकांसाठी अतिशय घातक
जुनं वाहन वापरणाऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा धक्का!