केरळ राज्यात PAM संक्रमणाचा वेगाने प्रसार होत असून आतापर्यंत 19 जणांचा बळी गेला आहे. या आजाराची 61 प्रकरणे राज्यभर नोंदली गेली आहेत. या घातक आजाराचे मूळ कारण म्हणजे नेग्लेरिया फाऊलेरी हा अमिबा, ज्याला सामान्य भाषेत ‘मेंदू(Brain) खाणारा अमिबा’ म्हणून ओळखले जाते.

कसा होतो संसर्ग?

हा अमिबा तलाव, धरणे व दूषित ताज्या पाण्यात आढळतो. पाण्याच्या संपर्कातून तो नाकावाटे मानवी शरीरात प्रवेश करतो. आंघोळ, पोहणे, किंवा दूषित पाणी वापरणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अमिबा गरम पाण्यातही जगू शकतो. मात्र, व्यक्तीकडून व्यक्तीत संक्रमण होत नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

लक्षणे कोणती?

सुरुवातीला साधी डोकेदुखी, ताप, मळमळ, उलटी ही लक्षणे दिसतात.

मात्र ही लक्षणे सामान्य असल्याने अनेकदा लोक दुर्लक्ष करतात आणि औषधं घेऊन थांबतात.

उपचारात उशीर झाल्यास अमिबा मेंदूच्या(Brain) ऊती नष्ट करतो, सूज निर्माण होते आणि मृत्यू होतो.

कोणत्या वयोगटाला जास्त धोका?

हा आजार लहान मुलं, किशोरवयीन, तरुण आणि वृद्ध या सर्व वयोगटांमध्ये आढळत आहे.

सध्या परिस्थिती काय?
आरोग्य यंत्रणा पूर्ण सतर्क असून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतीही लक्षणे दिसल्यास विलंब न करता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.

महाराष्ट्रात अद्याप मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर आलेली नाहीत. परंतु तज्ज्ञांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

‘या’ तारखेदरम्यान अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा इशारा
डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची ही आहे एक्सक्लूसिव संधी,
‘जो नडला त्याला मोडला…’