ईथे ओशाळली माणुसकी….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गतिमंद, अपंग व्यक्तीला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी कुटुंबे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पहायला मिळतात. पण अशाच व्यक्ती काहींना ओझे वाटू लागतात. त्यांना असेच कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी सोडून दिले जाते. प्रसंगी मारूनही टाकले जाते. काही जण आणखी वेगळाच विचार करतात. कोल्हापूरच्या दौलत नगर परिसरात एका कुटुंबाने 40 वर्षीय अपंग आणि गतिमंद महिलेला चक्क साखळदंडाला तीन कुलुपे लावून घरातच बंदीवान करून टाकले होते. एका निनावी फोनवरून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्या महिलेची सुटका केली. या घटनेने अवघे कोल्हापूरच नव्हे तर शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र सुंदर झाला. एका अगतिकतेतून किंवा आता बलतेतून हा प्रकार संबंधित महिलेच्या(woman) कुटुंबीयांकडून घडला असला तरी त्याचे समर्थन मात्र कुणालाही करता येणार नाही.

सारिका हनुमंत साळी (वय 40) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तिच्या घरी विवाहित भाऊ, भावजय आणि भाचा आहे. तिला साखर दंडाने जखडले होते. तीन ठिकाणी कुलूपे लावली होती. जेणेकरून तिने घराच्या बाहेर जाऊ नये. ती अशीच घराबाहेर पडून गल्लीत तसेच परिसरात वेडाचार करायची. लोकांना त्रास व्हायचा. म्हणून मग घरच्यांनी तिला साखर दंडात जखडून ठेवले होते. अशी प्राथमिक माहिती मिळते. उपचार करणे, अपंग महिलांची(woman) काळजी घेणाऱ्या संस्थेत दाखल करणे किंवा घरातच मोकळे सोडून, बाहेर जाताना घराला कुलूप लावणे असे काही पर्याय या साळी कुटुंबासमोर होते. पण घरातच तिला बंदीवान करून टाकणे. एक नव्हे तर साखळदंडाला तीन कुलपे लावणे, थोडीशी हालचाल करता येऊ नये याची व्यवस्था करणे ही एक प्रकारची क्रूरता आहे. तो पाशवी व्यवहार आहे.

सारिकाच्या(woman) कुटुंबीयांवर प्रचलित कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल. गुन्हा दाखल केला जाईल. पण सारिका चे पुनर्वसन कसे केले जाणार? त्याच कुटुंबात तिला सोडले जाणार काय? कारण इथली व्यवस्था सुद्धा या घटनेसमोर हतबल आहे. हॅंडीकॅप संस्थेकडून तिचा स्वीकार केला जाईल काय? अशा गतिबंध आणि अपंग व्यक्तीचे पुनर्वसन किंवा सांभाळ करणारी भक्कम व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. सारिका चे वय 40 च्या आसपास आहे. म्हणजे ती जन्मतः अशी असेल तर तिचे या वयापर्यंत संगोपन केले गेले आहे असे म्हणता येईल. पण आता ती कुटुंबाचे ओझे बनून राहिली आहे आणि हे ओझे टाकताही येत नाही तर मग काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर तिला बंदीवान करून शोधले गेले आहे. अर्थात ते मानवतेला काळे फासणारे आहे.

कोल्हापुरात बऱ्याच वर्षांपूर्वी अशीच एक माणुसकी बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली होती. कोल्हापूरचा बिंदू चौक म्हणजे विचारांचा जागर करणारे ठिकाण होय. या चौकात ऐतिहासिक बुरूजाशी संलग्न व्यासपीठ आहे. एका बाजूला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या दोन पुतळ्यांच्या मध्ये क्रांती स्तंभ आहे. जेव्हा सभा होत नसत
तेव्हा हा दगडी व्यासपीठ असलेला बिंदू चौक हा फिरस्त्यांचा आधार होता. एक असेच फिरस्ते कुटुंब उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी जाताना, आपल्या दोन लहान मुलांना साखळीने बांधून ठेवत असे. दगडी स्तंभाच्या भोवती ही साखळी लावली जायची. हे प्रकरणही तेव्हाच्या मीडियाने समाजासमोर आणले होते.

जिथे विचारांचा जागर होतो त्याच ठिकाणी लहान दोन मुलांना साखळीने बांधून ठेवले गेले होते. हा विरोधाभास तेव्हाच्या मीडियाने वाचकांना दाखवला होता. त्या घटनेची याद शुक्रवारी सारिका हनुमंत साळी या गतिमंद आणि अपंग महिलेच्या माध्यमातून ठळकपणे पुढे आली.

हेही वाचा :