गेल्या दहा दिवसांपासून उघडझाप करणाऱ्या तरण्या पावसाने सोमवारी(percent) मध्यरात्रीपासून आज दुपारपर्यंत मुसळधार हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांच्या पातळी झपाट्याने वाढ झाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली. वारणा धरणातून विसर्ग वाढवून तो ८५३० क्युसेकवर नेण्यात आला असून, पाणी वाढल्याने ३२ बंधारे पाण्याखाली गेले. दरम्यान, राधानगरी धरण ८७ टक्के भरले असून, अद्याप ३१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शहरातही रात्रीपासून सकाळपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली.

वाहन घोडा असलेल्या तरणा हे पावसाचे नक्षत्र गेल्या दहा दिवसांपूर्वी सुरू झाले; परंतु पावसाची रिपरिप, हलक्या सरी व उघडझाप असेच चित्र आतापर्यंत राहिले.सोमवारी मध्यरात्री मात्र या तरण्या पावसाने मुसळधार हजेरी लावून अक्षरश: नागरिकांना धडक भरविली. दुपारपर्यंत ही कोसळधार सुरूच होती. तसेच गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाली. यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या पावसामुळे नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या. सोमवारी रात्री २० फूट दोन इंच असणारी पंचगंगेची पाणी पातळी आज रात्री २६ फूट आठ इंचांवर पोहोचली. नद्यांची पाणी पातळी वाढल्याने पंचगंगेसह कासारी, भोगावती, दूधगंगा, वारणा, कुंभी, कडवी, ताम्रपर्णी, धामणी नदीवरील ३२ बंधारे पाण्याखाली गेले.(percent) चित्रीसह जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी, कोदे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित धरणे सरासरी ८० टक्के इतकी भरली आहेत. पावसामुळे एका घराच्या भिंतीची पडझड होऊन १० हजारांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ३८६ मालमत्तांचे सुमारे एक कोटी ३९ लाख ८७ हजार ९५० रुपये इतके नुकसान झाले.
गेल्या चोवीस तासांत राधानगरी धरण क्षेत्रात १२१ मि.मी., दूधगंगा धरण क्षेत्रात ७९ मि.मी., कासारी धरण क्षेत्रात ११३ मि.मी., कडवी धरण क्षेत्रात ९८ मि.मी., कुंभी धरण क्षेत्रात ७७ मि.मी., पाटगाव धरण क्षेत्रात १२० मि.मी., चिकोत्रा धरण क्षेत्रात ७० मि.मी., घटप्रभा धरण क्षेत्रात ११५ मि.मी., जांबरे धरण क्षेत्रात १११ मि.मी., सर्फनाला धरण क्षेत्रात ६७ मि.मी., धामणी धरण क्षेत्रात ९९ मि.मी., कोदे धरण क्षेत्रात १४३ मि.मी. पाऊस होऊन अतिवृष्टी झाली आहे.मंगळवारी ता. १५ राधानगरी धरणातून पाण्याता विसर्ग ३१०० क्युसेक, तसेच घटप्रभा ५९३४, वारणा- ८५३०, दूधगंगा- १६००, धामणी- ५०२८, कासारी- ८००, कडवी- २४०, तुळशी- ३००, कुंभी- ३००, सर्फनाला- ३४१, जंगमहट्टी- १९९, पाटगाव- ३००, चित्री- ८३५, जांबरे- १०४०, तर आंबेओहोळ धरणातून २५९ क्युसेक इतका होता.घटप्रभा, जंगमहट्टी, सर्फनाला, धामणी, चित्री ही धरणे १०० टक्के भरली आहेत; तर वारणा- ८३, राधानगरी- ८७, तुळशी- ८०, कासारी- ७४, दूधगंगा- ७२, कडवी- ९६, पाटगाव- ९२, कुंभी- ७६ आणि चिकोत्रा धरण ८३ टक्के भरले आहे.

शिराळा, ता. १५ : वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.(percent) चांदोली परिसरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. चांदोली परिसरात २४ तासांत ५३, तर ८ तासांत ६५ मिलिमीटर पाऊस झाला. चरण येथे २४ तासांत ६५.३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम भागात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
त्यामुळे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारी ४ पासून धरणाच्या वक्रद्वाराद्वारे सुरू असणारा २८७० क्युसेक विसर्ग वाढवून तो ६९०० व विद्युतगृहातून सुरू असणारा १६३० असा एकूण ८५३० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने वारणा नदीकाठच्या नागरिकांना वारणा धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गतवर्षी १२३० मिलिमीटर पाऊस झाला होता. आजअखेर १७१५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात २८.५३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या पावसाचे पाणी व धरणातून ८५३० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू असल्याने पाणी पात्राबाहेर पडले आहे.
जिल्ह्यातील स्थिती
राधानगरी धरण ८७ टक्के भरले
वारणा, कोयना धरणातून विसर्ग वाढविला
३२ बंधारे पाण्याखाली
गगनबावड्यात अतिवृष्टीमुळे कुंभी, सरस्वती, रुपणी नद्यांना पूर
पुरामुळे काही गावांचा बाजारभोगावशी संपर्क तुटला
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गुडन्यूज! राज्यात आता कृषी समृद्धी योजना सुरू
आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात माठी घसरण, चांदीचे भाव स्थिर!
अरे देवा! पुन्हा एकदा डाऊन झाला OpenAI चा चॅटबोट, हजारो युजर्स वैतागले!